आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
स्वत:हून ठरावित जगत जाण की........
दैवाने लिहलेल्या पुस्तकाची पाने उलगड़णे.
दूधावरच्या सायेसारखी कधी सूखे उपभोगणे...
तर कधी ताकावरच मन भागवण....
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
नागमोडी वाटेवर सुद्धा सरळ चालत जाण..
की सरळ वाटेवर उगाचच वळण घेण....
माणसाच्या जन्मात येउन सुद्धा माणूस म्हणुन न जगण....
की स्पर्धेच्या ह्या युगात रोबोट बनुन आपल अस्तित्व टिकवण......
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
फ़क्त शेवट येण्याची वाट बघण........
की मृत्युलाही आपल्या डोळ्यात पाणी आणायला लावण....
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
आयुष्य म्हणजे तरी काय?
Posted by
GSJ
on Thursday, September 24, 2009
Labels:
Marathi kavita,
मराठी कविता
No comments:
Post a Comment