जेव्हा सगळं मनाप्रमाणे घडत असतं ,
मन प्रसन्न असतं ,
सगळं छान , निरभ्र असतं,
तेव्हा तू कुठे असतेस ???
का असतेस अवती भवतीच ....
पण तुझं अस्तित्त्व मलाच जाणवत नाही ?
आज काल मी मला स्वार्थी वाटू लागलोय .... कारण ...
कारण जेव्हा बेचैनी असते, दुःख असतं, सगळं दाटून येतं ....
तेव्हाच तू आठवतेस ....
असंच झालंय बरेचदा .....
पण खरंच सांगतो ,
तू माझ्या अस्तित्वाचाच भाग आहेस ...
कदाचित ज्याला मी सुख किंवा आनंद म्हणतो ,
तेच एखाद्या मृगजळासारखं आहे
ज्याची इतकी भूल पड़ते की ....
स्वतःचं अस्तित्त्व सुद्धा विसरलं जावं .......
योगेश तपस्वी
No comments:
Post a Comment