जायचे होते तरीही
पाऊले उठलीच नाही..
हाक तु नाही दिली
अन आसवे ढळलीच नाही
कोणते होते बहाणे ?
तुज मनाच्या गंधकोशी
अंतरातुन साद आली
पण अंतरे सरलीच नाही
हासतांना तु सख्या
गेला निरोपा देवुनी
धुरकटे आभाळ होते
मी तरी भिजलेच नाही
का तुला कळलीच नाही
भावना माझी कधी
मी कविता होत गेले
सुर उद्भवलेच नाही ..
अमॄता__
No comments:
Post a Comment