हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी
तात्पर्य कथेचे ज्या बदले न कधी मृत्यो
काही दशके त्याचे पाल्हाळ कशासाठी
काढू सण एखादा ज्याला न 'उद्या' आहे
हे ईद दिवाळी वा नाताळ कशासाठी
पंखात बळे येता आकाश पुढे जाते
करतोस स्वतःला तू घायाळ कशासाठी
दुनियेत तुझ्या सध्या मीही जगतो आहे
बनतेस तुझ्यापुरती वेल्हाळ कशासाठी
अवतार तुझा हल्ली डरपोक मला वाटे
खांबातच लपण्याला आयाळ कशासाठी
आतून स्वतःला मी जाणून पुरा आहे
बाहेरच प्रतिमेचा सांभाळ कशासाठी
अवघड नव्हते देवा काहीच तुझ्यासाठी
दुष्काळ कशासाठी.... आबाळ कशासाठी
अपुले अपुले जगणे अपुले अपुले जाणे
देहास मनाची मग ही नाळ कशासाठी
आगीस कधी कोणी लावेल कशा आगी
कोणास विचारावे हा जाळ कशासाठी
माझी भूमिका, माझा लढा!
ब्लोग वर शोधा
काही दशके त्याचे.... पाल्हाळ कशासाठी
Posted by
GSJ
on Tuesday, September 22, 2009
Labels:
Marathi kavita,
भूषण कटककर
No comments:
Post a Comment