रसायन
!उघडून ठेव दारे तूही तुझ्या मनाची
...!मीही पुरी तयारी केली पलायनाची !
बहरे कुणाकुणाचे
...कोमेजते कुणाचे...इतकीच ही कहाणी प्रत्येक यौवनाची !
स्वप्ने कणाकणाची आली फुलून हिरवी
-मातीस लागता या चाहूलही घनाची !
इतके अनोळखी का झाले परस्परांना
?हृदयास या पटेना का खूण स्पंदनाची ?
मी ऐकले असे की, घनदाट खूप आहे -
मज वाट सापडेना माझ्यातल्या वनाची !!
नाही
; नसो, मनाची नसते बऱ्याच वेळा -आहे कुणास कोठे थोडी तरी जनाची !
तू बंधनांविनाही आहेस बांधलेला
...आता कशास भीती कुठल्याच बंधनाची !
वस्तीत माणसे या आहेत सभ्य काही
-झाडे चुकून काही आहेत चंदनाची !
अस्वस्थता मनाची थांबूनही न थांबे
...मेंदूत वाढ झाली कुठल्या रसायनाची ?
प्रदीप कुलकर्णी
No comments:
Post a Comment